पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे
पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये
हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवनआहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची
निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झाली आणि तिचा उपग्रह चंद्रसाधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी
तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचाव्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पॄथ्वीचे अंतर
साधारणपणे १४९,५९७,८९० कि.मी. एवढे आहे.
पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा
पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा
पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला
आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी
कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते
म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते.
पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या
प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली
नसती; पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच तिच्यावर जीवसृष्टी निर्माण
झाली असावी.पृथ्वीची विभागणी सुमारे ७१ % ( ७०.७८ %) पाणी आणि २९ % (२९.२२ %) भूभाग
अशी करणायत येते .पृथ्वीचा परिवलन काळ २३ तास ५६ मिनिटे ४ सेकंद (१ तास ) तर
परिभ्रमण काळ ( सूर्याभोवती ) ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे ५४ सेकंद (१ वर्ष ) एवढा असतो
.
|
पृथ्वीचे कक्षीय गुणधर्म |
||||||||||
|
अपसूर्य
बिंदू |
१५,२०,९७,७०१ कि.मी. |
|||||||||
|
उपसूर्य
बिंदू: |
१४,७०,९८,०७४ कि.मी. |
|||||||||
|
अर्धदीर्घ
अक्ष: |
१४,९५,९७,८८७.५ कि.मी. |
|||||||||
|
वक्रता
निर्देशांक: |
०.०१६७१०२१९ |
|||||||||
|
परिभ्रमण
काळ: |
३६५.२५६ दिवस |
|||||||||
|
सरासरी कक्षीय
वेग: |
२९.७८३ कि.मी./से. |
|||||||||
|
कक्षेचा
कल: |
७.२५° सूर्याच्या विषुववृत्ताशी |
|||||||||
|
असेंडिंग
नोडचे रेखावृत्त: |
३४८.७३९३६° |
|||||||||
|
उपसूर्य
बिंदूचे अर्ग्युमेंट: |
११४.२०७८३° |
|||||||||
|
कोणाचा
उपग्रह: |
सूर्य |
|||||||||
|
उपग्रह: |
१ (चंद्र) |
|||||||||
|
भौतिक
गुणधर्म |
||||||||||
|
सरासरी
त्रिज्या: |
६,३७१.० कि.मी. |
|||||||||
|
विषुववृत्तीय त्रिज्या: |
६,३७८.१ कि.मी. |
|||||||||
|
धृवीय त्रिज्या: |
६,३५६.८ कि.मी. |
|||||||||
|
फ्लॅटनिंग: |
०.००३३५२८ |
|||||||||
|
परीघ: |
४०,०७५.०२ कि.मी. (विषुववृत्तीय) |
|||||||||
|
पृष्ठभागाचे
क्षेत्रफळ: |
५१,००,७२,००० कि.मी.² |
|||||||||
|
घनफळ: |
१.०८३२०७३ × १०१२कि.मी.³ |
|||||||||
|
वस्तुमान: |
५.९७३६ × १०२४ किलोग्रॅम |
|||||||||
|
सरासरी घनता: |
५.५१५३ ग्रॅ./सें.मी.³ |
|||||||||
|
पृष्ठभागावरील
गुरुत्वाकर्षण(विषुववृत्ताजवळ): |
९.७८०३२७ मी./से.² |
|||||||||
|
मुक्तिवेग: |
११.१८६ कि.मी./से. |
|||||||||
|
सिडेरियल
दिनमान: |
०.९९७२५८ दिवस |
|||||||||
|
विषुववृत्तावरील
परिवलनवेग: |
४६५.११ मी./से. |
|||||||||
|
आसाचा
कल: |
२३.४३९२८१° |
|||||||||
|
उत्तर
धृवाचे अक्षवृत्त: |
९० |
|||||||||
|
परावर्तनीयता: |
०.३६७ |
|||||||||
|
पृष्ठभागाचे तापमान: |
|
|||||||||
|
विशेषणे: |
पार्थिव |
|||||||||
|
वातावरण |
||||||||||
|
पृष्ठभागावरील दाब: |
१०१.३ कि.पा. (समुद्रसपाटीवर) |
|||||||||
|
संरचना: |
७८.०८% नायट्रोजन (N2) |
|||||||||
पृथ्वीचे अंतरंग
१.
अग्निजन्य खडक २. जलजन्य किंवा स्तरीत किंवा गाळाचे खडक ३. रूपांतरित खडक.
बॅथोलिक : भूपृष्ठापासून
जास्त खोलीवर लाव्हारस थंड होऊन अशा प्रकारचे खडक निर्माण होतात. त्यांचा आकार
अवाढव्य व ओबडधोबड असतो. लाव्हारस पृष्ठभागावर न येता अंतर्गत भागातच थंड होत
असल्याने हवेशी संबंध येत नाही. सावकाश थंड होत असल्याने त्यातील स्फटिक कण मोठे
असतात.
लॅकोलिथ : भूपृष्ठाच्या खाली परंतु कमी खोलीवर लाव्हारस थंड होऊन खडक तयार झाले तर त्यांना लॅकोलिथ म्हणतात. इतर बाबतीत त्यांचे बॅथोलिक खडकांशी बरेच साधम्र्य असते. यांचा आकार साधारणत: घुमटाकार असून तळाला पसरट व वरील भाग खडबडीत असतो.
2) स्तरित / गाळाचे खडक : पुराचे पाणी ओसरून गेल्यावर नद्यांच्या काठांशी किंवा त्यांच्या पात्रांच्या कोरड्या पडलेल्या भागात चिखल, वाळू , गोल-गुळगुळीत गोटे इ. पाण्याने टाकून दिलेले पदार्थ आढळतात. वाहत्या पाण्याने टाकून दिलेले तशाच प्रकारचे पदार्थ नद्यांच्या मार्गावर असलेल्या अनेक जागी किंवा नद्या समुद्रात शिरत असतील, तर त्या समुद्राच्या तळाशी साचत असतात व ते साचून त्यांच्या जाड (कित्येकशे मीटर जाडीच्या) राशी तयार होतील, अशी परिस्थिती कोठेकोठे असते. वाऱ्याबरोबर वाहात गेलेली धूळ व वाळू साचून किंवा हिमनद्या व बर्फाचे थर यांच्याबरोबर वाहात गेलेले दगडधोंडे व दगडी चुरा साचून तयार होणाऱ्या किंवा झालेल्या राशीही आढळतात. वारा, वाहते पाणी किंवा वाहते हिम-बर्फ यांनी नेलेल्या व साचविलेल्या सर्व दगडी चुऱ्यास गाळ (अवसाद) म्हणतात. वर उल्लेख केलेल्या सर्व प्रकारच्या राशींचे घटक प्रारंभी सुटे असतात; पण गाळ साचून राशीची जाडी वाढली म्हणजे खालच्या गाळावर वरच्या गाळाच्या भाराचा प्रचंड दाब पडतो. शिवाय इतर अनेक प्रक्रियांही घडून येतात. त्यामुळे पूर्वी सुटे असलेले घटक कालांतराने एकत्र चिकटविले जातात व सुट्या गाळांचे एकसंध, संसक्त खडक तयार होतात. घटकांच्या प्रकारावरून अशा खडकांस निरनिराळी नावे दिली जातात. वाहत्या पाण्याने गुळगुळीत, गोल झालेले पुष्कळ गोटे ज्याच्यात आहेत अशा खडकाला पिंडाश्म म्हणतात. खडबडीत, झीज न झालेले पुष्कळ तुकडे असलेल्या खडकास कोणाश्म म्हणतात. वाळूचे कण एकत्र चिकटून तयार झालेल्या खडकास वालुकाश्म (वाळूचा दगड) म्हणतात. घट्ट चिकटलेली माती थराच्या रूपात असली म्हणजे त्या खडकाला पंकाश्म म्हणतात. पोथीत समांतर कागद असतात तशी मातीची रचना असणारा थर असला म्हणजे त्या खडकास शेल म्हणतात. गाळवटी खडक, चुन खडक, डोलोमाइट इ. गाळाचे खडकही महत्त्वाचे आहेत.
गाळाच्या खडकांपैकी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समुद्राच्या तळावर साचलेल्या
गाळांचे खडक होत. समुद्राच्या पाण्याचे प्रवाह पुरेसे जोरदार असले म्हणजे
त्यांच्यात शिरणारा गाळ किनाऱ्याशीच साचून राहत नाही. तो सर्वच्या सर्व अधिक खोल
भागातील तळावर पसरून टाकला जातो. दगड व गोटे किनाऱ्याजवळच साचविले जातात. भरड वाळू
अधिक दूरच्या, बारीक वाळू त्यांच्यापेक्षा दूरच्या व चिखलाचे
कण त्याच्याही पलीकडे व किनाऱ्यापासून सर्वांत दूर असलेल्या समुद्राच्या तळावर
साचविले जातात. गाळ साचून तयार होणारी राशी थरासारखी (चादरीसारखी) असते. गाळ साचणे
दीर्घ काळ चालू राहिले म्हणजे तो साचून तयार होणाऱ्या राशी सपाट आडव्या
थरांसारख्या असतात. साचण्याच्या क्रियेत खंड पडून अधूनमधून निक्षेपण झाले, तर थर स्पष्टपणे वेगळे दिसतात. कवचे किंवा हाडे
असणारे असंख्य जीव समुद्रात असतात व त्यांच्यापैकी शेकडो प्रत्यही मरत असतात.
त्यांची शरीरेही समुद्राच्या तळावर साचत असतात व ती तेथे साचणाऱ्या गाळात पुरली
जातात. त्यांचे मऊ भाग नाश पावतात; पण कठीण
भाग टिकून राहणे शक्य असते. ते टिकून राहिले, तर त्यांचे जीवाश्म होतात. समुद्राच्या तळाशी
साचलेल्या राशींचे घटक सुरवातीला अर्थात सुटे असता. कालांतराने ते एकत्र चिकटविले
जाऊन वालुकाश्म, पंकाश्म, शेल यांसारखे एकसंध खडक तयार होतात. सरोवरात व
नद्यांच्या पूरभूमींवर गाळ साचूनही गाळ्यांच्या खडकांचे थर तयार होतात.
३.रूपांतरित खडक : सर्वसाधारणपणे रूपांतरणाचे गतिज व ऊष्मीय असे दोन प्रमुख प्रकार ओळखले जातात. गतिज रूपांतरणात तीव्र प्रेरणा व कदाचित घर्षणजन्य उष्णता यांद्वारे खडकांत बदल घडून येतात. अंतर्वेशित अग्निज राशीच्या सान्निध्यामुळे अथवा इतर प्रकाराने तापमान वाढून खडकांत बदल झाल्यास त्यांना ऊष्मीय रूपांतरण म्हणतात. या दोन्हींचे खडकांवर वेगवेगळे परिणाम होतात. या दोन्हींच्या एकत्रित परिणामांमुळे (उदा., काही पर्वत भागांत) अतितीव्र प्रकारचे रपांतरण घडून येते.
कवचाची हालचाल होत असताना खडकांवर दाब पडणे किंवा ते वर किंवा खाली नेले जाणे अशा गोष्टी घडत असतात. पृष्ठभागी असलेल्या खडकांपेक्षा खोल भागातील खडकांचे तापमान अधिक असते व पृष्ठाजवळचा एखादा खडक खोल जागेत नेला गेला म्हणजे त्याचे तापमान वाढते. इतर रीतींनीही खडकांचे तापमान वाढणे शक्य असते. उदा., खडकांतील पोकळीत शिलारस घुसला म्हणजे त्याच्या उष्णतेने त्याच्यालगत असणारे खडक तापतात. शिलारसातील द्रव अथवा वायूतील मूलद्रवे सभोवतालच्या खडकांत घुसल्यास रूपांतरणाची तीव्रता वाढते. केवळ तापमान वाढल्याने शेल खडकांपासून रूपांतरणाने हॉर्नफेल्स खडक बनतात. नैसर्गिक घडामोडींत (उदा., गिरिजननात) खडकांच्या परिस्थितीत बराच बदल झाला, म्हणजे त्यांच्यावर बराच दाब पडला किंवा त्यांचे तापमान वाढले किंवा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडून आल्या, तर त्यांच्या मूळच्या स्वरूपात बरेच फेरफार घडून येतात. उदा., खडकांचे मूळची संरचना म्हणजे घटक कणांची मांडणी बदलते; मूळच्या खनिजांचे स्फटिक अधिक मोठे होतात किंवा वर उल्लेख केलेल्या फेरफारांपैकी दोन किंवा सर्व गोष्टी घडून येतात. सामान्यतः खडकांचे मूळचे रासायनिक संघटनही बदलते. मूळ खडकांतील काही वैशिष्ट्ये रूपांतरित खडकांत टिकून राहिलेली आढळतात. यावरून रूपांतरणाच्या काळात खडक सारतः घन अवस्थेत राहत असावेत. आधीच्या (उदा., अग्निज वा गाळाच्या) खडकांत फेरफार घडून येऊन तयार झालेल्या खडकांस रूपांतरित खडक म्हणतात. रूपांतरित खडकांपैकी अगदी सर्वांच्या परिचयाचा खडक म्हणजे लिहिण्याचा पाटीचा दगड होय. मातीसारख्या सूक्ष्मकणांनी बनलेल्या पंकाश्म, शेल व इतर खडकांवर एकंदरीत नीच तापमान असताना एखाद्या दिशेने दाब पडला म्हणजे त्यांचे पाटीच्या खडकांत रूपांतर होते. दाबामुळे माती घट्ट होते आणि तिच्यात ⇨ पाटन निर्माण केले जाते. पाटीच्या खडकांत समांतर पाटनपृष्ठे असतात व अशी पाटनपृष्ठे असल्यामुळेच पाटीच्या खडकाचे पातळ फरशीसारखे थर सहज अलग करता येतात. रूपांतरित खडकांपैकी महत्त्वाचे असे इतर खडक म्हणजे पट्टीताश्म आणि सुभाजा होत. हे खडक एकाच दिशेने पडणारा दाब व उष्णता यांच्या संयुक्त प्रभावामुळे तयार झालेले असतात. ते पूर्णतः स्फटिकमय असतात व त्यांची संरचना समांतर पट्ट्यांसारखी असते. पट्टिताश्मात क्वॉर्ट्झ व फेल्स्पार व क्वॉर्ट्झ आणि थोडेसे अभ्रक यांचे बनलेले असतात. ग्रॅनाइटाची खनिजे कोणत्याही विशिष्ट दिशेने रचलेली नसतात; पण ग्रॅनाइट पट्टिताश्मातील अभ्रकाच्या चकत्या जवळजवळ समांतर रांगा होतील अशा रीतीने रचलेल्या असतात व त्यामुळे ग्रॅनाइट पट्टिताश्माची रचना पट्टेदार झालेली असते. सुभाजा हे मुख्यतः अभ्रकासारख्या खनिजांचे म्हणजे चकत्यांसारखा आकार असणाऱ्या खनिजांचे किंवा काड्यांसारखा आकार असणाऱ्या हॉर्नब्लें डासारख्या खनिजांचे बनलेले असतात व त्यांचा घटक स्फटिकांची मांडणी जवळजवळ समांतर असते. एखाद्या पानाच्या जुडग्यात पाने किंवा कडब्याच्या पेंढीत ताटे असावित तशी सुभाजातील खनिजांची रचना असते. त्यामुळे त्यांना फोडून त्यांचे पत्र्यासारखे चपटे तुकडे सहज करता येतात. तापमान उच्च असताना पार्श्विक (बाजूंकडून पडणाऱ्या) दाबामुळे मातीच्या खडकांत अभ्रकाचे भरड स्फटिक तयार होतात व अभ्रकी सुभाजा नावाचा सर्वस्वी स्फटिकामय खडक तयार होतो. तो मुख्यतः अभ्रकाचा बनलेला असतो. त्याच्यातील अभ्रकाच्या चकत्या जवळजवळ समांतर असतात व पाटीच्या दगडापेक्षाही अधिक सुलभपणे त्याचे तक्ते वेगळे करता येतात. रूपांतरित खडकांचा आणखी एक प्रकार म्हणजे मूर्ती किंवा पुतळे करण्यासाठी वापरला जाणारा संगमरवर हा होय. चुन्याच्या खडकांवर बंदिस्त जागेत उष्णतेच्या परिणामाने स्फटिकीकरण होऊन संगमरवर तयार होतो. काही अग्निज म्हणून मानण्यात आलेले खडक हे शिलारस थिजून नव्हे, तर रूपांतरणाने बनल्याचे आता उघड झाले आहे.
दाब, तापमान व विविध प्रकारच्या रूपांतरित खडकांमधील
खनिजांचा संच निर्माण होताना असणारी परिस्थिती यांच्याशी निगडीत असलेले
रूपांतरणाचे प्रश्न हे अग्निज शिलाविज्ञानातील अशाच प्रश्नांसारखे असतात.
रूपांतरित खडकांच्या अभ्यासातून मिळालेली माहिती भूविज्ञानामधील पुष्कळ मूलभूत
प्रश्नांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. उदा., रूपांतरित खडकांमधील उच्च दाबाला बनलेल्या
खनिजांच्या आधारे मूळचे खडक जास्तीत जास्त किती खोलीवर गाढले गेले होते, ते समजू शकते, तर तापमानाच्या ठराविक पल्ल्यात तयार होणाऱ्या
रूपांतरित खनिजांवरून अंतर्वेशनाच्या वेळी अग्निज राशीच्या सीमेवरील तापमानाविषयी
अनुमान करता येते.
पृथ्वीच्या गती
पृथ्वीचे परिवलन
पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते
त्याला क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर
असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती
पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या
विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.
पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी २३ तास,
५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात पूर्ण
करते. सूर्याचा संदर्भ घेऊन विचार केला तर पृथ्वी
बरोबर एक दिवसात अथवा २४ तासात एक फेरी पूर्ण करते. हा फरक पृथ्वीच्या
सूर्याभोवतीच्या परिभ्रमणामुळे होतो. प्रति दिवशी हा फरक ८६,०००(२४ तासांचे सेकंद)/३६५.२५(एका
वर्षातील दिवस) = ३ मिनिटे ५६ सेकंद एवढा असतो.
पृथ्वीचे
परिभ्रमण
पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. पृथ्वीच्या सूर्याभोवती
फिरण्याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वी एका वर्षात
सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते.
परीभ्रमनाचे परिणाम
१)उत्तरायण आणि
दक्षिणायन
पृथ्वी ३६५
दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. हे जरी सर्वांना माहीत असले
तरी तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष सरळ नसून २३. ५ अंशाने कललेला आहे हे मात्र
अनेकांना माहित नसते.
पृथ्वी २३. ५
अंशाने एका बाजूस कललेली आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये ती सूर्याभोवती प्रदक्षिणा
पूर्ण करते. ह्या कललेल्या अवस्थेमुळे काय परिणाम होतात ते जाणून घेण्यासाठी
सर्वप्रथम आपण पृथ्वीची कललेली स्थिती एका उदाहराणाने समजावून घेऊया. एका टेबलावर
मधोमध चेंडू ठेवा आणि असे समजा की तो सूर्य आहे. आता हातामध्ये एक पेन घ्या.
पेनाचा आकार गोल नसला तरी थोड्या वेळासाठी त्याला आपण पृथ्वी समजूया. आता पेनाला
सरळ उभे धरलेल्या अवस्थेमध्ये सूर्य असलेल्या चेंडू भोवती फेरी मारा. पेनाने चेंडू
भोवती फेरी मारताना एक गोष्ट आपणास कळेल की सर्व बाजूंनी पेनाचे चेंडूपासूनचे अंतर
सारखेच होते.
आता हातामध्ये
पकडलेला पेन सरळ न पकडता थोडासा तिरका पकडा आणि त्याच अवस्थेमध्ये चेंडू भोवती एक
फेरी मारा. आता आपणास कळेल की पेनाची वरची एक बाजू एकवेळेस चेंडूच्या जवळ येते तर
त्याच्या विरुद्ध ठिकाणी ती बाजू दूर जाऊन पेनाची खालची बाजू चेंडूच्या जवळ येते
तर दोन समोरासमोरील ठिकाणी पेन आणि चेंडू मधील (म्हणजे पृथ्वी आणि सूर्य) अंतर
सारखेच असते.
पृथ्वीदेखील
कललेल्या अवस्थेमध्येच सूर्याभोवती फेरी मारीत असल्याने काही वेळेस पृथ्वीचा उत्तर
ध्रृवाकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांनी पृथ्वीच्या दक्षिणेकडील
भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य-पृथ्वी
अंतर सारखेच असते.
पृथ्वीची जी बाजू
सूर्याच्या जवळ असते तेथे उन्हाळा तर जी बाजू दूर असते तेथे हिवाळा असतो.
कमी-जास्त तापमानामुळे ऋतू होतात. जर अक्ष कललेला नसता तर ऋतू झालेच नसते.
आपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. २१ मार्च ते २१ जून पर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच 'उत्तरायण' असे म्हणतात. तर २२ सप्टेंबर तर २२ डिसेंबर पर्यंत सूर्य दक्षिण दिशेस सरकतो. यालाच 'दक्षिणायन' असे म्हणतात. तर २२ मार्च आणि २२ सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेस उगवतो. ह्या दोन तारखांना 'विषुवदिन' असे म्हणतात. ह्या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात.
2) दिवस रात्रीची असमानता :
३.ऋतूंची निर्मिती
ऋतूंची संख्या
प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची
नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे.
परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात. उदा० उष्ण कटिबंधातील लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू
ठरवतात कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. समशीतोष्ण कटिबंध दोन किंवा तीन ऋतू मानतो तर शीत कटिबंधातील प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात.
मात्र भारतामध्ये वर्षाला तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले
आहे: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर सहा उपऋतू(वसंत,ग्रीष्म,वर्षा,शरद,हेमंत,शिशिर) आहेत.
ऋतूंमागील कारणे
|
|
|
|
विविध ऋतू असण्याचे प्राथमिक कारण
म्हणजे पृथ्वीचा अक्ष [[पृथ्वीचे भ्रमण प्रतल|पृथ्वीच्या सूर्या भोवतीच्या भ्रमण
कक्षेशी]काटकोनात नसणे हे होय. तो काटकोनापासून '२३.५' अंशाने कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर पडणारे
सूर्याचे किरण कमीअधिक तिरपे पडतात. जसजशी पृथ्वी सूर्यभ्रमण करते तसतसा
सूर्यकिरणांचा तिरपेपणा कमी जास्त होत राहतो. त्यामुळे तापमानात फरक होतो आणि ऋतू
बदलतात. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन विरुद्ध ऋतू चालू असतात.
ऋतूंमध्ये होणारे हवामानातील किरकोळ
बदल इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात. उदा० पृथ्वीची गती (परिवलन आणिपरिभ्रमण), सूर्याची पृथ्वीकडे येणारी उष्णता,
समुद्र किंवा मोठी सरोवरे,
गल्फ स्ट्रीम, एल निनो सारखे समुद्रातील प्रवाह,
आणि वाऱ्यांचे प्रवाह,
वगैरे. या गोष्टी हवामानावर परिणाम
करतात. या सर्व घटकांमध्ये नवीन भर पडली आहे ती म्हणजे -जागतिक तापमानवाढ किंवा Global
Warming.
संस्कृती आणि ऋतू
जगात विविध संस्कृतीमधील लोक वेगवेगळे
ऋतू मानतात. उदा०.भारतात पाळल्या जाणाऱ्या हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षात सहा ऋतू आहेत. खालील समीकरणे
प्रतीकात्मक आहेत.
वसंत + ग्रीष्म = उन्हाळा=
चैत्र, वैशाख + ज्येष्ठ
आणि आषाढ हे मराठी महिने
वर्षा + शरद = पावसाळा=
श्रावण, भाद्रपद + आश्विन, कार्तिक हे मराठी महिने
हेमंत + शिशिर = हिवाळा =
मार्गशीर्ष, पौष + माघ, फाल्गुन हे मराठी महिने
किंवा,
वसंत ऋतू =
सूर्य मीन आणि मेष या राशींत असण्याचा
काळ(अंदाजे १५ मार्च
ते १५ मे)
ग्रीष्म ऋतू =
सूर्य वृ्षभ आणि मिथुन मेष या राशींत
असण्याचा काळ(अंदाजे १५ मे
ते १५ जुलै)
वर्षा ऋतू =
सूर्य कर्क आणि सिंह या राशींत
असण्याचा काळ(अंदाजे १५ जुलै
ते १५ सप्टेंबर)
शरद ऋतू =
सूर्य कन्या आणि तूळ या राशींत
असण्याचा काळ(अंदाजे १५ सप्टेंबर
ते १५ नोव्हेंबर)
हेमंत ऋतू =
सूर्य वृश्चिक आणि धनु या राशींत
असण्याचा काळ(अंदाजे १५ नोव्हेंबर
ते १५ जानेवारी)
शिशिर ऋतू =
सूर्य मकर आणि कुंभ या राशींत असण्याचा
काळ(अंदाजे १५ जानेवारी
ते १५ मार्च)
पृथ्वीच्या हजारो वर्षांच्या आयुष्यात
वर दिलेल्या ऋतूंच्या तारखा आणि महिने बदलले गेले असण्याची शक्यता आहे. परंतु
परंपरा फारश्या बदलेल्या नाहीत.
उत्तर ऑस्ट्रेलिया प्रदेशातील लोक सहा ऋतू मानतात तर
विषुववृत्तीय, उष्ण कटिबंधीय आणि काही समशीतोष्ण
कटिबंधातील प्रदेशांमध्ये सुका ऋतू आणि ओला ऋतू (पावसाचा ऋतू) असे दोनच प्रकार मानले
जातात ज्यामध्ये आर्द्रतेच्या प्रमाणात होणारा बदल हा तापमानातील बदलापेक्षा जास्त
लक्षणीय ठरतो. प्राचीन इजिप्तमध्ये तीन ऋतू मानले जात होते: पुराचा ऋतू,
पूर ओसरण्याचा ऋतू आणि सुगीचा ऋतू. त्याचप्रमाणे काही
प्रदेशांमध्ये तेथील विशिष्ट परिस्थितींनुसार ऋतू मानले जातात,
जसे टोर्नाडो अॅली या अमेरिका देशातील भागामध्ये उत्तर
हिवाळ्यापासून ते मध्य उन्हाळ्यापर्यंतटोर्नाडो वादळाचा ऋतू असतो. भारतातही मे,
ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर ह्या चार
महिन्यांच्या कालाला चक्री वादळाचा ऋतू म्हणतात. भूमध्यसागरी हवामान असणाऱ्या प्रदेशांमध्ये (उदा. पश्चिम ऑस्ट्रेलिया, कॅलिफॉर्निया किनारपट्टी आणि स्पेन, वगैरे) उन्हाळातील वणव्यांचा ऋतू असतो. चक्रीवादळांचा ऋतू उत्तर वसंताच्या आसपास सुरू होतो.
पूर्वोत्तर प्रशांत महासागरी प्रदेशांमध्ये हा ऋतू मे १५ तर उत्तर अटलांटिक प्रदेशांमध्ये जूनच्या एक तारखेला सुरू होतो.
विविध प्रदेशातील
ऋतू
प्रदेशागणिक होणारा हवामानातील बदल हा
वाढत्या अंतरानुसार अधिक स्पष्ट होतो. जसे की एकाच गावातील दोन ठिकाणचे हवामान
सारखेच मानले जाते, तेव्हा सू़क्ष्म फरक बाजूला ठेवले जातात. परंतु हीच दोन ठिकाणे
काहीशे किंवा काही हजार किलोमीटर अंतरावर असतील तर मात्र ही ठिकाणे
वेगवेगळ्या हवामानाची असू शकतात. त्याचसोबत सभोवतालची भौगोलिक परिस्थितीही
त्याकरिता महत्त्वपूर्ण ठरते. उदा. काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ यांमधील हवामान खूपच वेगळे आहे,
तसेच ऋतूदेखील थोडे अधिक वेगळे आहेत.
पण हा ऋतूंमधील फरक काश्मीर आणि कन्याकुमारी दरम्यान जास्त स्पष्ट दिसून येतो. हीच
अंतरे काही हजार किलोमीटर पर्यंत वाढविल्यास विविधता आणखी वाढते. वर्षभरातील
तापमानानुसार पृथ्वीचे अनेक भाग कल्पिलेले आहेत. त्यानुसार शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध हे तीन मुख्य विभाग भाग पडतात.
|
महिने आणि ऋतू |
|||||
|
उत्तर
गोलार्ध |
महिना |
दक्षिण
गोलार्ध |
|||
|
पारंपरिक |
हवामानशास्त्रीय |
खगोलीय |
हवामानशास्त्रीय |
खगोलीय |
|
|
हिवाळा |
हिवाळा |
हिवाळा |
जानेवारी |
उन्हाळा |
उन्हाळा |
|
वसंत |
फेब्रुवारी |
||||
|
वसंत |
मार्च |
शरद |
|||
|
वसंत |
एप्रिल |
शरद |
|||
|
उन्हाळा |
मे |
||||
|
उन्हाळा |
जून |
हिवाळा |
|||
|
उन्हाळा |
जुलै |
हिवाळा |
|||
|
शरद |
ऑगस्ट |
||||
|
शरद |
सप्टेंबर |
वसंत |
|||
|
शरद |
ऑक्टोबर |
वसंत |
|||
|
हिवाळा |
नोव्हेंबर |
||||
|
हिवाळा |
डिसेंबर |
उन्हाळा |
|||
४)
तापमानात बदल
पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र :