जमखिंडचा उठाव - Scholarship Exam

     अप्पासाहेब पटवर्धन हे इंग्रजधार्जिणे जमखिंडीचे राजे होते. आपल्या संस्थानात गडबड झाल्यास आपण तत्पर असावे या उद्देशाने त्यांनी शस्त्रास्त्रे व दारुगोळा जमविला. किल्ल्याची दुरुस्ती केली. पण इंग्रजांना याही हालचाली संशयास्पद वाटल्या. रेसिडेंटने गवर्नरला ही माहिती कळविली. गवर्नरने जमखिंडीत संशयितांना पकडण्यास सुरुवात केली. म्हणून हा उठाव सुरु होण्याआधीच दडपला गेला. बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा करून ठेवल्याबद्दल अटक व राजपद काढून घेतले. १८५७ च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार आप्पासाहेबांची सुटका व राजपद परत मिळेल.